नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने आपली २०१ वी दुर्गसंवर्धन मोहीम थंडीच्या कडाक्यातही रामशेज किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने पूर्ण केली. रविवारी (१० डिसेंबर २०२४) झालेल्या या मोहिमेत किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, स्वच्छता, आणि जनजागृती करण्यात आली. शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी उपस्थित पर्यटकांना रामशेजच्या ऐतिहासिक शौर्याची ओळख करून दिली. तसेच दुर्गसंवर्धनासाठी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि शाश्वत […]
कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी महामेळाव्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना या भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्यापासून (९ डिसेंबर २०२४) सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या समर्थनार्थ महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव […]
गेल्या आठवड्यात राज्यात उष्णतेचा अनुभव घेत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. थंडीने पुन्हा एकदा राज्यात पुनरागमन केले असून तापमानात चार अंशांनी घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार, दक्षिण-पूर्व पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज […]
उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे नितीन शंकर शेट्टी (वय ३२) याचा सहा जणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयत्याने निघृण खून केला. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या १० तासांत मुंबई नाका पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. नितीन शेट्टी आणि संशयितांमध्ये सकाळी झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. संशयितांपैकी एकाच्या इडली गाडीला लाथ […]
नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून नव्याने तयार होणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी दिल्ली येथे खा. राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून रखडला होता, मात्र खा. वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्याला […]
नाशिक प्रतिनिधी :- सागर वाबळे शिर्डीहून नाशिकला आलेल्या ई-बसने (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग बसस्थानकावर फलाटाजवळ अचानक नियंत्रण गमावल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव अंजली थट्टीकोंडा-नागार्जुन (२३, रा. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असून, त्या पती मुपाल्ला नागार्जुन (३०) यांच्यासोबत चौकशी कक्षाजवळ चालत […]
नाशिकमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशोका मार्ग परिसरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा पकडून तीन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता या परिसरात सापळा रचून २ लाख ९७ हजार पाचशे रुपयांच्या एमडीसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजय भिका रायकर (३६), मोसिन हानिफ शेख (३६), आणि अल्ताफ पीरण शहा (३५) […]
मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर […]
नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता मंदिरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. हे घडलं दुपारच्या वेळी, जेव्हा रस्त्यावर वर्दळ असतानाही चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबवली. मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून, त्यात कधी दानपेटी फोडून रक्कम लांबवली जाते, तर कधी थेट […]
नाशिक: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू चरित्र आणि त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून पुरोगामी चळवळीचे कार्य आणखी पुढे नेण्याचा संकल्प ब्रिगेडच्या तरुण कार्यकर्त्यांनी केला. कार्यक्रमात उपस्थित असलेले समाजकल्याण संचालक ग. पा. माने, तुळशीदास चराटे, हिरामण नाना वाघ, अविनाश आहेर, […]