Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the all-in-one-seo-pack domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the news-blog domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 6121
नाशिक मध्य मतदारसंघातहिंदूत्ववादाचाच विजय होणार,आ. देवयानी फरांदे यांचा विश्वास - आपला महाराष्ट्र

नाशिक मध्य मतदारसंघातहिंदूत्ववादाचाच विजय होणार,आ. देवयानी फरांदे यांचा विश्वास

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक ( प्रतिनिधी)- हिंदूत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे हिंदूत्व ही सर्वसमावेशक जीवनशैली आहे. यावर माझी अतीव श्रध्दा व निष्ठा असल्याचे प्रतिपादन प्रा. देवयानी फरांदे यांनी केले. मध्य नाशकात झालेल्या प्रचारफेरी दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
या निवडणुकीत भरघोस मते मिळून हिंदूत्ववादाचा विजय निश्चितपणे होणार असा विश्वासही प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, मला माझ्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. ज्या धर्माने मला ताठ मानेने जगायला शिकवले त्याचा अर्थातच स्वाभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले हिंदूत्व आम्ही जगतोय. ही विचारधारा शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूत्ववाद ही गरज आहे. काही राजकीय पक्षांना मात्र हिंदू असूनही हिंदुत्वाविषयी बोलण्याची लाज वाटते.
मी हिंदुत्ववादी असल्यामुळे विरोधक टीका करतात. पण हिंदुत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. श्रद्धा आणि आस्थेचे हिंदुत्ववाद हे एक ठिकाण आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान का नसावा? ज्या धर्माने मला जगायला शिकवले त्याचा मला स्वाभिमान का नसावा? छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आम्ही जगतोय.. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद आज आमच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे आणि तो का नसावा? आज कुणीही झंड करून यावे आणि आमच्या धर्मावर आक्रमण करावे? ही बाब आम्ही सहन कशी करणार? आरे ला कारेने उत्तर देणे सर्वांनाच जमते. पण आम्ही सहिष्णू आहोत. त्यामुळे आम्ही सबुरीने घेतो. पण आमच्या सबुरीला कुणी हलक्यात घेत असेल तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद माझ्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ती ठेवते, हे ध्यानात असावे. अर्थात, ही माझी भूमिका केवळ वैयक्तिक विचारधारेवर आधारित नाही, तर ती माझ्या देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याचा माझा संकल्प आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या मते, हिंदुत्व हे केवळ हिंदू धर्माशी निगडित नाही, तर ती एक सर्वसमावेशक जीवनशैली आहे. या जीवनशैलीत धार्मिकता, सांस्कृतिकता, आणि राष्ट्रीयता या तीन घटकांचा समन्वय असतो. याचसंदर्भात मी हिंदुत्ववादी असल्याचे मानते, कारण ही जीवनशैली मला आपल्या देशाच्या प्राचीन परंपरांचे आणि मूल्यांचे रक्षण करण्यास प्रेरणा देते. आजच्या काळात, देशाच्या स्थैर्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्ववाद आवश्यक आहे, कारण विशिष्ट धर्मांचे आक्रमण, जागतिकीकरण आणि इतर सामाजिक आव्हाने यासंदर्भात तोच प्रभावी उपाय आहे. हिंदुत्व हा विचार केवळ काही दशकांचा नाही, तर तो हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. जाज्वल्य हिंदुत्व म्हणजे आपल्या धर्माबद्दल आणि संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहणे. जाज्वल्य हिंदुत्ववादी असणे म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्माच्या महानतेची जाणीव ठेवणे आणि त्यातील तत्त्वज्ञान, वेद, उपनिषद, महाभारत, रामायण यांसारख्या धार्मिक ग्रंथांना आपल्या जीवनाचा मार्गदर्शक मानणे. माझ्या मते, जाज्वल्य हिंदुत्व हे फक्त धार्मिकता किंवा उपासना यांपुरते मर्यादित नाही, तर त्यात समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एकत्वाची भावना आणि सहिष्णुतेचा आदर असतो. आपल्या देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत हिंदुत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारत हा एक प्राचीन देश असून, येथे अनेक धार्मिक परंपरा विकसित झाल्या. पण तरीही, बाहेरून आलेल्या धर्मांनी आणि संस्कृतींनी भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणांमुळे आपल्याला वेळोवेळी आपल्या धर्माचे रक्षण करावे लागले. त्यामुळे आजही आपल्या देशाला हिंदुत्ववादी विचारांची गरज आहे, जेणेकरून भारतीय संस्कृतीचे रक्षण करता येईल. हिंदुत्व हा केवळ धार्मिक विचार नाही, तर तो भारतीय राष्ट्रीयतेशी जोडलेला आहे. देशाच्या अस्मितेसाठी आणि त्याच्या सांस्कृतिक ओळखीच्या रक्षणासाठी हिंदुत्व महत्त्वाचे ठरते. आजच्या काळात, जागतिकीकरणामुळे आणि परकीय प्रभावांमुळे आपल्या संस्कृतीवर घाला येत आहे. परकीय जीवनपद्धतींनी भारतीय समाजात प्रवेश केल्यामुळे आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा हास होत आहे. अशा परिस्थितीत, हिंदुत्ववादी विचार देशाच्या अस्तित्वासाठी आणि त्याच्या सांस्कृतिक ओळखीच्या जपणुकीसाठी आवश्यक आहेत, असेही फरांदे यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपा नेते अमित शहा कायमच उघडपणे हिंदूत्वाचा पुरस्कार करतात. नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधील जाहीर भाषणात त्याचा पुनरुच्चार केला. बटेंगे तो कटेंगे हे योगी आदित्यनाथ यांनी वारंवार सांगितले आहे. महाराष्ट्रात येऊनही जागे केले आहे. म्हणून मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे. आपल्या व पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जागे होण्याची हीच वेळ आहे. येत्या २० तारखेला सर्वांनी संविधानाने दिलेला आपला मतदानाचा अधिकार व हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (1) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5471

Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (1) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5471