नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प अंतिम टप्प्यात: खा. राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा फळाला

नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून नव्याने तयार होणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी दिल्ली येथे खा. राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून रखडला होता, मात्र खा. वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्याला […]

नाशिक बसस्थानकात ई-बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोन जखमी

शिर्डीहून नाशिकला आलेल्या ई-बसने (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग बसस्थानकावर फलाटाजवळ अचानक नियंत्रण गमावल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव अंजली थट्टीकोंडा-नागार्जुन (२३, रा. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असून, त्या पती मुपाल्ला नागार्जुन (३०) यांच्यासोबत चौकशी कक्षाजवळ चालत असताना बसच्या धडकेत सापडल्या. या […]

अशोका मार्गात एमडी ड्रग्जसह तिघांना अटक; तस्करीचा नवा खुलासा

नाशिकमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशोका मार्ग परिसरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा पकडून तीन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता या परिसरात सापळा रचून २ लाख ९७ हजार पाचशे रुपयांच्या एमडीसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजय भिका रायकर (३६), मोसिन हानिफ शेख (३६), आणि अल्ताफ पीरण शहा (३५) […]

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाचा आधारस्तंभ हरपला – उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर […]

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. […]

‘वंदे मातरम्’‌ व ‘राज्यगीताने’ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

कपालेश्वर मंदिरात दानपेटी चोरी, मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता मंदिरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. हे घडलं दुपारच्या वेळी, जेव्हा रस्त्यावर वर्दळ असतानाही चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबवली. मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून, त्यात कधी दानपेटी फोडून रक्कम लांबवली जाते, तर कधी थेट […]

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ..

मुंबई: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची […]

संभाजी ब्रिगेडने बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला

नाशिक: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू चरित्र आणि त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून पुरोगामी चळवळीचे कार्य आणखी पुढे नेण्याचा संकल्प ब्रिगेडच्या तरुण कार्यकर्त्यांनी केला. कार्यक्रमात उपस्थित असलेले समाजकल्याण संचालक ग. पा. माने, तुळशीदास चराटे, हिरामण नाना वाघ, अविनाश आहेर, […]

समतेच्या विचाराला पुढे नेण्याचा निर्धार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427